Thursday, February 2, 2017

सुविचार

सुविचार


दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.



आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.



आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.


अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.



आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.



आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.



आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.



आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.



गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.



इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.



अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.



तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.

:शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.



संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.



संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.



हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.



“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”



“नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.”



“विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.”



अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.



अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.



आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.



काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात

पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते.



कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.



जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..



जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.



जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.



जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..
 विचार करून कृती करा. 

उत्तम ग्रंथ हे माणसाचे कायमचे मित्र आहे. 

दुसर्याला सुधारण्यापूर्वी स्वतःला सुधारावे. 

मोठ्या घरापेक्षा मोठे हृदय केव्हाही श्रेष्ठ.  

स्व:ची चूक कबूल करण्याला मनाचा मोठेपणा. 

शिक्षणाची मुळे गोड नसली तरी त्याची फळे कडू नसतात.

न्यायाची मागणी करताना स्वतः न्यायी असली पाहिजे. 

सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण साधते. 

जो ज्ञानानी परिपूर्ण असतो तोच खरा ज्ञानी आहे. 

मनुष्य हवं आपल्या भाग्याचा कारागीर असतो. 

शरीर हे जीवनाची बंदीशाळा नसून आत्म्याचे मंदिर आहे.

 सर्वात गुणात महत्त्वाचा गुण म्हणजे तळमळ. 

विद्यादान हे अन्न  दानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. 

अर्धवट ज्ञानाने मनुष्य अधिक बडबड करतो. 

आनंद सर्वव्यापी आहे पण तो अनुभवता आला पाहिजे. 

माणसाची खऱी ओळख त्याच्यात अंत:करणातील नम्रतेने होते. 

सुंदर अक्षर हा अलंकार आहे. 

आजचा आदर्शवाद हा उद्याचा वास्तववाद असतो. 

जेथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथे देवता प्रसन्न होते. 

वर्तमानकाळाचा जास्तीत जास्त उपयोग करावा.

पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.

मोहाचा पहिला क्षण हि पापाची पायरी  आहे. 

सर्व गुणात महत्वाचा गुण म्हणजे तळमळ होय. 

कपडे रंगविल्याने मनाचा रंग बदलत नाही. 

अज्ञानी असा पण वाईट असू नका. 

विनय हा गुण सर्व सदगुणांचा अलंकार आहे. 

विद्या ही गरिबीची धन आणि श्रीमंतांचा अलंकार आहे. 
 
 आत्म दर्शन हे जीवनातील काव्य आहे. 

 देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहे.

खोटा मान, खोटी ऐट सीड म्हणजे तुम्हाला काही कमी पडणार नाही. 

माणुसकीचा ओलावा पैश्याच्या उबेपेक्षा श्रेष्ठ असतो.  

व्यायाम ही एक अमृत वल्ली आहे. 

प्रेमाने जे मिळते ते कायम टिकून राहते. 

जो कायदा जुलमी वाटतो ते मानाने हे प्रजेचे काम आहे. 

शरीराला स्वाथ्य तसा मनाला विनोदही आवश्यक आहे. 

गरिबांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा होय. 

माणुसकीची घडण घडविण्यामध्ये संस्कृतीचा मोठा भाग आहे. 

जो अधिक शिकेल तो सूर्यासारखा चमकेल. 

मांगल्याची पूजा हीच खरी परामेश्वराच्या उपासना होय. 

श्रीमंती वार्यावर उडून जाते, कायम टिकते ते चारित्र्य
















0 टिप्पणी(ण्या):

Post a Comment